शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील शेतकऱ्यांचे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:49 IST

परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देसोयाबीनची नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमककृषी मंत्रालयाकडून बैठकीचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कोल्हापूर : परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले. नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत दारातून उठणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबत बुधवारी (दि. १०) बैठक घेण्याचे मंत्रालयातून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर ठिय्या उठविला.

अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी बुधवारी दुपारी एक वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलनकर्ते व मंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी चर्चा घडवून आणली. यादव यांनी मंत्री पाटील व कृषी सचिवांशी संपर्क साधला. त्यानंतर आंदोलकांबरोबर बुधवारी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन कृषी मंत्रालयातून आल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले. दीपक किपने, उद्धव पोळ, रामकृष्ण रोटे, भीमराव मोगले, अशोक साखरे, बाळासाहेब जमरे, राजेभाऊ राठोड, सोपान जोखर, बंडू आव्हाड, उमाजी घुमरे, बळिराव शिंदे, रामराव गव्हाणे, आदी शेतकरी सहभागी झाले होते.

विलास बाबर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामामध्ये ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात ४३ टक्के आणेवारी आली असताना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाशी संगनमत करून परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यांतील मळणी व कापणीचे प्रयोग करताना शेतकºयांना अंधारात ठेवून चुकीचे उत्पन्न दाखविले. या प्रयोगावर पंच, संबंधित शेतकरी, प्रयोग करणाºया कर्मचाºयांच्या स'ा नाहीत. एकाच हस्ताक्षरात पंचनामे केले असून त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली. पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम तालुक्यातील चौदा मंडळांतील उत्पन्न ३० टक्केदेखील आलेले नाही. येथील शेतकºयांनाही रास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत शेतकºयांनी उपोषण केले. नागपूर अधिवेशन काळात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी बैठक झाली. यामध्ये भरपाई देण्याचे आश्वासन दिले; पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर ५ सप्टेंबरला पुन्हा शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. पुन्हा आश्वासन दिले; पण पदरात काहीच नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा निर्णय घेतला. आता पुन्हा बुधवारच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे; पण नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा बाबर यांनी दिला.पोलिसांचे दातृत्वशेतकरी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परभणी जिल्'ातील खेड्यापाड्यांतून कोल्हापूरकडे निघाले होते. दुपारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना नाष्टा-पाणी दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर